१७व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाजीराव शिंदे, अप्पाजी हुबळीकर आणि मालोजी भोसले या सरदारांना या परिसरावर सोडले आणि तोरगळ स्वराज्यात आणला!
Tag:
Trekking
शिवरायांची दुर्गनीती आणि जलनीती पाहू जाता हे लक्षात येत की या महापुरुषाने कौटील्यापासून साऱ्या आचार्यांनी लिहिलेली दुर्गशास्त्राची तत्वे आत्मसात केली असून अनेक ठिकाणी त्यात सुधारणा देखील केली आहे!
या योद्ध्याच्या समाधीस्थळाला भेट देताना आपसूकच आमची पावले थबकली. फाटकापाशी पायातील वहाणा काढून ठेवल्या. आस्तिक असो व नास्तिक या ठिकाणी चपला-बूट काढूनच दर्शनाला जायचे!
“माझी ही दोघी कुत्री नसती तर मी तिथंच मेलो असतो!”, जवळच बसलेल्या नान्याच्या कानामागे खाजवत मारुतीदादा कृतज्ञता पूर्वक म्हणाले.
आधीच पांडुरंग चाळकेंनी नकार दिला होता. त्यात आता कदम साहेबांची भर! आता दुसरा वाटाड्या शोधणे आले. आणि जर तो नाही मिळाला तर आमचा पुढचा अख्खा ट्रेक रद्द करावा लागणार होता!!
कोयनेच्या जंगलात त्या गव्याने माझ्याकडे पाहत, नाकपुड्यांतून जोरदार हुंकार टाकला!! माझ्या पोटात खोल खड्डा पडला! झालं!संपलं सगळं!
आणि त्या धारेच्या मागे, गूढ अशा अंधारात गुडूप झाली होती एका तपस्वीने, एका लढवय्या सन्याशाने आपल्या अस्तित्वाने पावन आणि चैतन्यमय केलेली एक प्राचीन निसर्गनिर्मित गुहा – रामघळ!
